पुणे प्रतिनिधी :भविष्यात पाण्याची टंचाई होईल आणि त्यासाठी काही तरी करायला पाहिजे या उद्देशाने MPS Multi Services पुणे यांनी Rain Water harvesting system ने बोअर रिचार्ज करण्याचे तंत्र विकसित केले आहे व येणाऱ्या काळात पाणी टंचाईवर मात कशी करता येईल यासाठी कंपनीचे प्रमुख श्री प्रणीष देशमुख यांनी ही नवीन सिस्टिम नुसतीच पुणे येते सुरवातीला प्रारंभिक मॉडेल म्हणून लाँच केले आहे.

ज्ञानेश्वरी रेसिडेन्सी कोंढव – धावडे व हंसराज कॉम्प्लेक्स , देशमुखवाडी पुणे येथे ही सिस्टिम लावून दिली आहे.अनेक आसपासच्या सोसायटीमध्ये प्रमुख व सभासद सिस्टिम पहायला जात आहेत.ही सिस्टिम चालू केल्या पासून पाणी टंचाई जाणवलेली नाही असे तेथील रहिवाश्यांनी प्रतिनिधीला सांगितले आहे.या सिस्टिमचा भविष्यात खूप उपयोग होईल अशी चर्चा सर्वदूर पसरलेली आहे व कंपनीकडे अनेकांची तशी मागणी ही आलेली आहे असे प्रतिपादन कंपनीचे मालक श्री प्रणीष देशमुख यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.




